15 August Independence Day Information in Marathi Independence Day Mahiti in Marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन संपूर्ण माहिती सोप्या भाषेत | 15 August Independence Day Information in Marathi Independence Day Mahiti in Marathi

15 August Independence Day Information in Marathi – 15 ऑगस्ट बद्दल संपूर्ण माहिती पाहूया भारत देशात 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. हे तर सर्वांना माहिती आहे. परंतु खूप जणांना माहिती नसेल की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस म्हणून का साजरा केला जातो. आणि या दिवसाला एवढं महत्त्व का दिले आहे. या दिवसा मागचे कारण काय आहे. आपल्या भारत देशात यावर्षी 77वा स्वातंत्र दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरी पासून सुटका मिळाली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का इंग्रज या दिवशी भारत सोडून का गेले होते. ही सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे. चला मग जाणून घेऊया. 15 ऑगस्ट दिवस स्वातंत्र्य दिनाची सविस्तर माहिती.

अनुक्रमाणिका

 

स्वातंत्र्य म्हणजे काय? (What is Independence in Marathi)

स्वातंत्र्याच्या विचार केला असता. वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्याचे अर्थ आहेत. स्वातंत्र्याच्या एक अर्थ म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य. भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालेले स्वातंत्र्य हे याच पद्धतीचे आहे. त्यामागे इंग्रजांची हुकूमशाही व त्यापासून स्वातंत्र होण्यासाठी लोकांनी केलेल्या लढाईची पार्श्वभूमी आहे. तुम्हाला माहिती असेल, जगामध्ये अनेक देश जबरदस्तीने वेगवेगळ्या युरोपीय देशांच्या साम्राज्याच्या भाग बनवले गेले होते. त्या राजवटीपासून मुक्तता होण्याच्या अर्थ म्हणजेच जसा भारत देश इंग्रजांच्या म्हणजेच परकीय आणि वसाहतवादी राजवटी पासून स्वातंत्र झाला होता त्यालाच राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणता येईल. अशा पद्धतीने स्वतंत्र्याच्या अर्थ प्रामुख्याने वसाहतवादी मुळे आपल्या ओळखीला आलेला आहे.

 

15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा केला जातो? (Why 15 August celibrate as independence day)

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळाले होते. म्हणून 15 ऑगस्ट हा आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य दिवस आहे. 15 ऑगस्ट रोजी दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 76 वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने स्वातंत्र्य दिन साजरा केला जात असतो. देशाचे पंतप्रधानचा हस्ते ध्वजारोहण होते. आणि त्यानंतर दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाची आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्राणाची आठवण करून देतो.

 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या इतिहास (History of Independence day In Marathi)

ही गोष्ट त्या काळातली आहे. तेव्हा भारत देश इंग्रजांच्या हुकूमशाहीचा गुलाम होता. आणि त्यावेळेस वर्ल्ड वॉर 2 तेव्हाच नेमका समाप्त झाला होता. तेव्हाचे ब्रिटिश डायरेक्टर लार्ड माउंटबैटनने 30 जून 1948 या दिवशी भारताची सत्ता भारतीयांना सोपवून भारत सोडून गेले होते. भारताचे जनरल सी. राजगोपाल चारी आणि देशातील काही नेत्यांचे म्हणणे होते की, माउंटबैटन ने 30 जून पर्यंत भारताला सत्ता दिली नसती तर, यांच्याकडे सत्ता राहिली नसती. कारण माउंटबैटन हा नेत्यांशी भेटी-गाठी करत होता. इंग्रज हुकूमतांच म्हणणं होतं की, जून 1948 पर्यंत भारताला स्वातंत्र्य भेटेल. परंतु जिन्नाची नवीन वेगळा देश निर्माणची मागणी होती. त्यामुळे देशात सांप्रदायिक दंगे होत होते. त्याच्यामुळे इंग्रजी हुकूमतला सांभाळन कठीण झालं होतं. भारत स्वतंत्रचे बिल 4 जुलै 1947 ला इंग्रज हुकूमत यांनी संसदला दिले. आणि काही 2 आठवड्यात स्वतंत्रचे बिल पास झाले. त्यानंतर असे ठरवले गेले की, भारत आणि पाकिस्तान विभाजनानंतर 15 ऑगस्टला भारतात इंग्रज शासन समाप्त होईल. एक इंग्रजी फ्रीडम एट मिडनाईट या पुस्तकामध्ये लार्ड माउंटबैटनने सांगितलं की, त्यांना ह्या गोष्टींचे कल्पना आधीच होती की, हे काम त्यांना लवकरच करावे लागेल. त्यांचं म्हणणं होतं की, हे सर्व सप्टेंबर पर्यंत होऊन जाईल. लार्ड माउंटबैटनने पुस्तकात सांगितले आहे की, त्यांनी 15 ऑगस्ट दिवस यामुळे ही निवडला होता की, या दिवशी ही वर्ल्ड वॉर 2 मध्ये जपानी सेनाने इंग्रजी हुकूमतचा समोर घुटणे टेकले होते. याच्या पूर्ण श्रेय लार्ड माउंटबैटनला याला मिळनार होता. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट या तारखेला निवडले होते. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

 

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे महत्व (What is the Importants Of Independence Day)

आपल्या भारत देशात दरवर्षी 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व म्हणजेच ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला इंग्रजांची हुकूमशाही पासून मुक्त केलेल्या त्यागांची आठवण करून देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतर, जगात भारत देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारताने स्वातंत्र्याच्या श्वास घेतला. या दिवशी इंग्रजांच्या ध्वज उतरवून भारतीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे त्या दिवशी देशभरात अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जातो. 15 ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते. आणि या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण पंतप्रधान देशातील राजकीय प्रमुख असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीमधील असलेला लाल किल्ल्यावर असलेले लाहोरी गेटच्या माथ्यावरून भारतीय ध्वजारोहण केले जाते. आणि या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशातील नागरिकांना संबोधित करतात.

 

स्वातंत्र्यदिनी असणारे कार्यक्रम (Swatandtrya Dini Asanare Karyakram)

15 ऑगस्ट या दिवशी दिल्लीमधील लाल किल्ल्यावर देशाच्या राष्ट्रध्वज फडकवला जातो. आणि त्यानंतर देशातील विविध ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली जाते. खूप ठिकाणी ध्वजारोहण मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात. या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असली तरी देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. या दिवशी भारतीय नागरिक एकमेकांना अभिवादन करतात व खूप ठिकाणी मिठाई चॉकलेट वाटप देखील केले जाते. त्याचप्रमाणे भारतीय नागरिक एकमेकांना व्हाट्सअप किंवा फेसबुक वर देखील स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी देशात मोठमोठे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

स्वातंत्र्य दिनाच्या निष्कर्ष (Swatantrya Din Nishkarshya)

15 ऑगस्ट या दिवशी देशात स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून तेव्हापासून हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यानुसार स्वातंत्र्य दिनामुळे देशातील लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होते. तसेच हा दिवस भारतीयांना एकत्र आणतो आणि त्याचप्रमाणे लोक समजतात की, आपण सर्व अनेक भाषा, अनेक धर्म व सांस्कृतिक मूल्य असलेले एक राष्ट्र आहोत. विविधतेतील एकता हे भारत देशाचे प्रमुख सार आणि सामर्थ्य आहे. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असल्याचा आम्हा भारतीयांना अभिमान वाटतो.

 

स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ता दिवस या दोघांमध्ये फरक काय आहे? (What is Deffernce Between Independence Day & Republic Day)

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यामुळे हा दिवस स्वतंत्र्य दिन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशात संविधान लागू करण्यात आले होते. त्यामुळे या दिवशी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करतात आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच 26 जानेवारी रोजी राजपथावर संचलन सादर केले जाते. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान करतात आणि 26 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपती ध्वज फडकवतात कारण पंतप्रधान हा देशातील राष्ट्रीय प्रमुख असतो, तर राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख असतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्टला पदपथ संचलन होत नाही, तर 26 जानेवारीला सैनिक निमलष्करी इत्यादींची पदपथ संचलन होते. यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम तसेच सुंदर रथ प्रदर्शन इतर विविध कार्यक्रम होतात.

 

स्वातंत्र्य दिन कधीपासून साजरा केला जातो? (Swatantra Din Kadhi Pasun Sajara Kela Jato)

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा दिल्लीमधील असलेला लाल किल्ल्यावर लाहोटी गेटच्या माथ्यावरून भारतीय ध्वजारोहण केले होते. आणि त्यानंतर देशाला संबोधित केले होते. तेव्हापासून भारत देशात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

 

भारतात ब्रिटिशांचे नियंत्रण कोणत्या वेळी होते?

पोर्तुगीयांचे भारतामध्ये प्रगती पाहून ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या उद्देशाने लंडन मधून व्यापाराच्या एका गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी भारतात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कारण ब्रिटनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. ब्रिटनची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून होती. त्यामुळे जगामध्ये एकूण उत्पन्नापैकी फक्त 3 टक्के मराठी ओपन मध्ये व्हायचे. त्याकाळी पोर्तुगाल व स्पेन यासारख्या मुख्य युरोपीय सत्तांनी व्यापारामध्ये ब्रिटनला मागे टाकले होते. 1608 साली ब्रिटिशचे कॅप्टन भारतात सुरतमध्ये बंधारामध्ये हेक्टर या जहाजावर आले. हिस्टरी कंपनी ही व्यापारी संस्था होती. त्यामुळे व्यापारातून लाभ करण्यासाठी ब्रिटिशांनी 50 वर्षांमध्ये भारताच्या बहुतेक भाग नियंत्रणात आणला.

 

स्वातंत्र्य दिनाच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी

स्वातंत्र्य दिनामुळे देशातील लोकांमध्ये देशभक्ती भावना जागृत होते तसेच हा दिवस भारतीयांना एकत्र आणतो आणि ते नागरिक असे समजतात सर्व धर्म मिळून आणि सांस्कृतिक मूल्य असलेल्या एक देश आहे. अशाप्रकारे भारतीयांची एकता हे भारतातील प्रमुख सार आणि सामर्थ्य आहे. जगभरात सर्वात मोठी लोकशाहीचा देश असल्याच्या आम्हाला अभिमान आहे. भारत स्वतंत्र झाल्याचे दृष्टिकोन भारतीयांच्या वेगवेगळ्या आहे. काही लोकांचे हे दीर्घ संघर्षाचे स्मरण आहे आणि काहीजणांचे देशाच्या गौरवतेचे आहे. त्यामुळे भारतात देशभक्तीची भावना दिसून येते.

 

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा (Independence Day Wishes Whatsapp Status In Marathi)

1) ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, माणुसकी धर्म आहे या देशाच्या, फक्त देशासाठी जगा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2) रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, तरी सारे भारतीय एक आहेत. 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3) अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया

4) दिल दिया है, जान भी देंगे, ए वतन तेरे लिए स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5) कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देश धर्म. Happy Independence day

6) लाख मेले तरी चालतील पण लाखाच्या पोशिंदा जगलाच पाहिजे

7) सूर्यनारायण जर उगवले नसते तर, आकाशाच्या रंग समजला नसता, जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरच हिंदू धर्माच्या अर्थ समजला नसता

8) जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थ काय

9) सर्वांनी जपा एकमेकांचे सुख तेव्हाच सुंदर होईल आपला देश हॅपी 15 ऑगस्ट

10) हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. वंदे मातरम भारत माता की जय

11) सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी ये गुलसीता हमारा

12) सदैव फडकत राहो तिरंगा आपुला, सर्व जगातील प्रिय देश आपुला

13) देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे

14) गावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणूकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी

15) जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या त्या शहिदांना आम्ही वंदन करतो Happy independence Day

FAQ. 15 August Independence Day Information in Marathi Independence Day Mahiti in Marathi

Q. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा केला जातो?

Ans. या दिवशी भारताला इंग्रजांच्या गुलामगिरी पासून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून 15 ऑगस्ट ला स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो.

Q. 15 ऑगस्टला काय झाले? (what happen on 15th August)

Ans. या दिवशी भारताला इंग्रजांपासून मुक्तता भेटली. त्यामुळे भारत भारत देश स्वतंत्र होता.

Q. 15 ऑगस्ट 1947 रोजी गांधीजी कुठे होते?

Ans. 14,15 ऑगस्ट 1947 ला सर्व भारत देशात आनंदाच्या महोत्सव होता. तेव्हा महात्मा गांधी राजधानी पासून दूर कलकत्ता मध्ये होते.

Q. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी किती वेळ लागला?

Ans. 200 वर्ष इंग्रजांच्या गुलामी नंतर भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य भेटला.

Q. इंग्रजांनी भारताला का सोडले?

Ana. 1946 रोजी ब्रिटनने घोषणा केली की, भारताला ते स्वातंत्र्य देणार आणि आता देशाचे प्रशासन सांभाळू शकत नाही. त्यांनी सांगितलं की, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर देश सोडून जाणार त्यानंतर शेवटी वायसराय लॉर्ड माऊंटबेटन यांनी 15 ऑगस्ट 1947 ही तारीख नेमली.

Q. स्वातंत्र्य दिनाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?

Ans. Independence Day

Q. स्वातंत्र्याची लढाई केव्हापासून सुरू झाली?

Ans. 1857 ला भारतीय स्वतंत्रता संग्राम शिपाई विद्रोह आणि भारतीय विद्रोह नावावरून ओळखले जाते.

Q. इंग्रज भारतात केव्हा आले?

Ans. 24 ऑगस्ट 1608 रोजी व्यापाराच्या उद्देशाने भारतात सुरत बंदर वर आले होते.

Q. 14 ऑगस्ट 1947 रात्री काय झालं होते?

Ans. या दिवशी रात्री 12 वाजेला भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पूर्ण देशाला संबोधित करत होते.

Q. इंग्रज कोणत्या देशातले होते?

Ans. इंग्लंड

Q. असे कोणते राज्य आहे त्या राज्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात नाही?

Ans. गोवा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर गोवा मध्ये पोर्तुगांचे शासन होते.

Q. 15 ऑगस्ट या दिवशी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोण करते?

Ans. देशातील राजकीय प्रमुख असल्यामुळे भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करतात.

Q. भारतात ब्रिटिश केव्हा आले?

Ans. पोर्तुगीयांचे भारतामध्ये प्रगती पाहून ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या उद्देशाने लंडन मधून व्यापाराच्या एका गटाने 31 डिसेंबर 1600 रोजी भारतात ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.

Q. यावर्षी 2023 मध्ये कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे?

Ans. 2023 मध्ये 77 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार आहे.

Q. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी काय केले?

Ans. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांनी भारत सोडल्यानंतर भारताने स्वातंत्र्याच्या श्वास घेतला. या दिवशी इंग्रजांच्या ध्वज उतरवून भारतीय ध्वजारोहण करण्यात आले.

Q. स्वातंत्र्य दिनाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात?

Ans. Independence day

Q. भारत केव्हा स्वातंत्र्य झाला?

Ans. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र झाला.

Q. 26 जानेवारी कोणत्या दिवसाठी साजरा केला जातो?

Ans. 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top